E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
संपादकीय
काश्मीरमधील शापित सौंदर्य
Samruddhi Dhayagude
24 Apr 2025
वैशाली शिरोडकर, पहलगाम
निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेला काश्मीरचा भाग दहशतीच्या सावटाखालीही फुलतो आहे. गेल्या चार-पाच भेटींदरम्यान येथील निसर्गसौंदर्याबरोबरच आम्ही वाढत्या पायाभूत सुविधांचा अनुभवही घेतला आहे. मात्र ताजी भेट इतकी धक्कादायक आणि हादरुन टाकणारी असेल, अशी कल्पनाही केली नव्हती. पर्यटकांवरील दहशतवादी हल्ल्याचा अनुभव, ताण शब्दात व्यक्त करणे कठीण आहे.
‘सौंदर्या’मध्ये रमणीयता, मोहकता, विलोभनीयता आदी शब्दांची सुंदर गुंफण आपसूकच होत असली, तरी प्रत्येक वेळी ते दिसतेच असे नाही. काही अन्य पदरांचे वलय, त्यांचे अस्तित्व आणि प्रभाव यामुळे सौंदर्य बाधित होते. यालाच आपण ‘शापित सौंदर्य’ म्हणतो. म्हणजेच सौंदर्य नाकारता येत नाही पण त्याचा निरलस आनंदही अनुभवता वा उपभोगता येत नाही. काश्मीरसारख्या नितांतसुंदर भागाची अवस्था काहीशी अशीच आहे.
देशाच्या या भागावर निसर्गाने लयलूट केली आहे. बर्फाच्छादित डोंगर, रमणीय दर्या; कधी धुक्यात, कधी बर्फात तर कधी मऊशार गवतांमध्ये हरवलेल्या वाटा, ऋतूंमध्ये बहरणारे ताटवे, केशराचे मळे, रसरशीत सफरचंदाच्या बागा हे आणि यासारखे सौंदर्य अन्य भागात बघायला मिळणे विरळाच. म्हणूनच सौंदर्य आणि काश्मीर हे परस्परांना समानार्थी असल्यासारखे शब्द आहेत. दहशतीचा पडदा विरळ असताना चित्रिकरणांसाठी अनेक निर्मात्यांनी देशाच्या या कोपर्याची वाट धरली ती याच कारणामुळे! पुढे दहशतीची दाहकता वाढत गेली, दहशतवाद्यांकडून होणार्या हल्ल्यांचे प्रमाण आणि क्रौर्य वाढत गेले आणि सरकारी-लष्करी अधिकार्यांप्रमाणेच सर्वसामान्यांनाही त्याची झळ पोहोचू लागली तेव्हा मात्र रुपेरी पडद्यावरुनच नव्हे तर, पर्यटकांच्या बकेट लिस्टमधूनही काश्मीरचा पत्ता कट होऊ लागला.
काश्मीरच्या विविध भागांमध्ये होणारे दहशतवादी हल्ले, त्यात ठार झालेल्यांची यादी आणि राजकारण्यांकडून वाहिल्या जाणार्या श्रद्धांजलीच्या ठोकळेबाज ओळी अनेक वर्षे वर्तमानपत्रांच्या पहिल्या पानावरील एक कोपरा व्यापून राहिल्या. त्यामुळेच अनुच्छेद ३७० हटवले जाणे, काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करत देशाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेणे, खोर्यामध्ये विकासकामांनी वेग घेणे हा घटनाक्रम पुढे पुढे सरकू लागला तशी काश्मीर बघण्याची सर्वसामान्याच्या मनातील आशाही पल्लवित होऊ लागली. बोगदे, रेल्वे वा अन्य साधनांनी प्रवास सुखकर झाल्यामुळे काश्मीरमधील वर्दळ वाढली आणि देश दहशतवादाचा नायनाट झाल्याचे चित्र रंगवू लागला. मात्र २२ एप्रिलचा भयावह पण तितकाच भेकड हल्ला या देखण्या चित्रावर पाणी फिरवणारा ठरला.
भयंकर धक्का
काश्मीरमध्ये फिरण्याची ही काही पहिली वेळ नव्हती. यापूर्वी चार वेळा आम्ही काश्मीरला भेट दिली होती. आताही पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी पावले काश्मीरकडे वळली होती. प्रेक्षणीय स्थळे पाहताना टूर लिडरने बैसरनचे गवताळ पठार बघण्याबाबत सुचवले होते. दिवस मोकळा असल्यामुळे आम्हीही तिथे जाण्याचा विचार करत होतो. मुख्य म्हणजे हे स्थळ आमच्या हॉटेलपासून अगदी जवळ होते. मात्र तिथे जाण्यासाठी पायी अथवा घोड्यावरुन जाणे हे दोनच पर्याय असल्याचे समजले. अनेक वेळा ट्रेक केल्यामुळे घोड्यावरुन जाताना त्रास होतो, हे ठाऊक होते. त्यामुळेच आम्ही स्थळ बदलले आणि दुसरे ठिकाण निवडून तिकडे फिरुन आलो. हॉटेलमध्ये परतेपर्यंत या दहशतवादी हल्ल्यांची कल्पना नव्हती पण त्यानंतर अनेकांचे खुशाली विचारणारे फोन येऊ लागले. आलात का, रुममध्येच आहात ना अशा प्रश्नांमुळे परिस्थितीची दाहकता समजली आणि अगदी हाकेच्या अंतरावर इतका मोठा नरसंहार झाल्याचे समजताच अंगावर वीज कोसळण्यासारखे वाटले. हा भयंकर धक्का होता. या घटनेनंतर बाहेरच्या हालचाली तीव्र झाल्या. रूममध्ये असूनही हेलिकॉप्टरच्या घिरट्या वाढल्याचे जाणवत होते. आधी कधीच हा अनुभव आला नव्हता. नंतरचा पूर्ण काळ धावपळ जाणवत राहिली. थोड्याच वेळात हल्ल्याची दाहकता, क्रौर्याची परिसीमा आणि निरपराधांचे गेलेले बळी याविषयी स्पष्टता येत गेली आणि आपण अतिशय स्फोटक स्थितीचा अनुभव घेत असल्याचे सत्य समोर आले. आजपर्यंत घडले नव्हते असे अघटित या घटनेतून दिसून आले. धर्मांधतेचे रूप किती उग्र असू शकते हे जवळून समजले.
स्थानिकांची मदत
भीषण दहशतवादी हल्ल्याची बातमी पसरताच पर्यटकांनी काश्मीर सोडण्याचा निर्णय घेतला. आम्हीही तात्काळ परत फिरण्याचा निर्णय घेतला. मात्र येताना भीतीचे वातावरण दिसले नाही. रस्ते शांत होते. नेहमी असते तेवढेच जवान रस्त्यांवर तैनात दिसले. फार मोठा बंदोबस्त वा तपासण्या कुठेही दिसल्या नाहीत. दुकाने बंद असल्यामुळे एक प्रकारची शांतता मात्र होती. अर्थात स्थानिकांची खूपच मदत मिळाली. आमच्याशी बोलताना त्यांना या घटनेमुळे झालेले दु:ख स्पष्ट दिसत होते. उद्विग्न चेहर्याने ड्रायव्हर ‘हा तर आमच्या रोजीरोटीवरचा हल्ला आहे...’ असे म्हणाला, तेव्हा त्याच्या डोळ्यातील आर्थिक चणचणीचे चित्र स्पष्ट वाचता येत होते. गप्पांचा धागा हाती घेत काही प्रश्न विचारले तेव्हा तो मोकळेपणाने व्यक्त होत म्हणाला, ‘आधीच वर्षानुवर्षांच्या दहशतवादामुळे आमच्या शिक्षणाचे पुरते नुकसान झाले आहे. शिक्षण मधेच थांबले. आयुष्य फरपटले.’ हीच बाब वा खंत पूर्वीच्या भटकंतीवेळीही सर्वसामान्यांकडून आम्हाला ऐकायला मिळाली होती.
परतीच्या प्रवासात आम्हाला सरकारी मदत घेण्याची गरजच पडली नाही. हॉटेलमधील लोकांनी सगळ्यांच्या प्रवासाची सोय केली होती. सगळेच एकदम निघाल्यामुळे कदाचित त्यांच्यावर ताण आला असेल, पण परिस्थिती सुसह्य होती. मात्र पर्यटकांनी भरलेले काश्मीर अचानक रिकामे झाल्यानंतर एक प्रकारचा ताण जाणवत होता. स्थिती सामान्य झाल्याखेरीज पर्यटक तिथे फिरकणार नाहीत. अर्थात ते कधीच फिरकणार नाहीत असे नाही. शेवटी हा आपल्याच देशाचा एक भाग आहे. त्यामुळेच इथे येणार्या आमच्यासारख्या पर्यटकांची संख्याही बरीच मोठी आहे. इथे काही ना काही अप्रिय घटना घडतच असतात. मात्र त्याला घाबरुन पर्यटक येणारच नाहीत, असे होणार नाही. इथेच नव्हे तर, जगभर असे प्रसंग समोर येत असतात. जगातील अनेक देशांमध्ये मोठे बाँबस्फोट झाले आहेत. दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये अनेकांनी जीव गमावले आहेत. आपल्या मुंबईतही हीच परिस्थिती होती. पण याला घाबरुन कोणी मुंबईत जाणे थांबवले नाही. त्यामुळे आज शांत झाले असले तरी काश्मीरमधले पर्यटन थांबणार नाही.
सुरक्षा यंत्रणेत गलथानपणा
या घटनेमागे सुरक्षा यंत्रणेतील गलथानपणा कारणीभूत असू शकतो. ही व्यवस्था चोख असती आणि वेळीच डाव लक्षात आला असता तर तो उधळून लावणे फारसे कठीण नव्हते. पण आपण तिथे कमी पडतो, असे वाटते. अन्यथा, आता हा भाग परका वाटावा असा राहिलेला नाही. इथली अगत्यशीलता उल्लेखनीय आहे. सौंदर्याबद्दल तर वेगळे बोलायलाच नको. खेरीज आता पायाभूत सुविधा वाढल्यामुळे अनेक बाबी सुकर झाल्या आहेत. आपलाच एक भाग असणार्या या भागातील देवाणघेवाण पर्यटकांच्या माध्यमातूनच वाढणार आहे. म्हणूनच अशा घटनांनी घाबरुन, धास्तावून ही वाट वगळण्याचा विचार अयोग्य ठरेल. अशाने कोणतेही प्रश्न सुटणार नाहीत. हा प्रश्न सर्वसामान्यांना विश्वासात घेऊनच सोडवावा लागेल.
मुख्य म्हणजे आधी उल्लेख केल्याप्रमाणे दहशतवादाचा त्रास केवळ पर्यटकांना होतो असे नाही तर, येथील नागरिकांना अधिक प्रमाणात होत आहे. यात सामान्य माणूस भरडला जात आहे. ही बाब आम्ही अनेकांकडून अनेक वेळा ऐकली आहे. त्यांनाही सामान्य आयुष्य जगायचे आहे. मागील वेळा सीमेपर्यंत फिरायला गेलो असता लोकांनी आपल्या या भावना व्यक्त केल्या होत्या. लष्कराने आमच्यासाठी खूप काही केल्याचे सांगत त्यांनी समाधान व्यक्त केले होते. खरचंच इथे हॉस्पिटल, कॉलेज, रस्त्यांची व्यवस्था सुधारली आहे. कलम ३७० हटवल्यानंतर तर परिस्थितीमध्ये आमूलाग्र बदल झाल्याचा अनुभव आम्ही घेतला आहे. आता हा भाग सुरक्षित वाटतो. त्यामुळेच पर्यटनासाठी काश्मीरचा पर्याय निवडताना मनात कोणतीही भीती नव्हती. मात्र या घटनेचे दु:ख फार मोठे आहे. हा विकासाला खीळ घालण्याचा प्रकार म्हणावा लागेल.
आता भारत सरकार याला कसा प्रतिसाद देते हे बघावे लागेल. काश्मीरमध्ये पर्यटकांवर इतका मोठा हल्ला होण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळेच यावर सरकारला गांभीर्याने विचार करावा लागेल. हल्ल्यात भारतीय नागरिकांबरोबरच दोन परदेशी पर्यटकांचाही मृत्यू झाल्यामुळे प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे, कारण ही बाब आपल्या देशाची जागतिक प्रतिमा डागाळणारी आहे. महत्त्वाचे म्हणजे दहशतवाद्यांनी पर्यटकांची धार्मिक ओळख पटवण्यासाठी वापरलेली पद्धत जाहीरपणे सांगणेच अशक्य आहे. यामुळे निर्माण झालेले भीतीयुक्त वातावरण लवकरात लवकर घालवावे लागेल. मात्र या घटनेला प्रतिसाद देताना भारतामध्ये काही चुकीच्या गोष्टी घडणे योग्य नाही. भावनेचा भडका उडू न देता शांतता राखणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. आज अस्वस्थ असणार्या या वाटांवरुन आम्ही परतीचा प्रवास करत आहोत. पण काही काळातच परिस्थिती निवळेल, धोका संपुष्टात येईल आणि काश्मीरमधील गल्ल्या पुन्हा एकदा गजबजतील ही अपेक्षा आहे.
(शब्दांकन: स्वाती पेशवे)
Related
Articles
सध्या पाकिस्तानकडे अणु कार्डचा पर्याय नाही
11 May 2025
देवदर्शन करून परतणार्या पिता-पुत्रावर काळाचा घाला
16 May 2025
कोण आहेत विक्रम मिस्री?
12 May 2025
हरता हरता जिंकले!
11 May 2025
ठाण्यात २ कोटींचे अमली पदार्थ जप्त
13 May 2025
दोन देशांत अचानक कोविडचे रुग्ण वाढले
16 May 2025
सध्या पाकिस्तानकडे अणु कार्डचा पर्याय नाही
11 May 2025
देवदर्शन करून परतणार्या पिता-पुत्रावर काळाचा घाला
16 May 2025
कोण आहेत विक्रम मिस्री?
12 May 2025
हरता हरता जिंकले!
11 May 2025
ठाण्यात २ कोटींचे अमली पदार्थ जप्त
13 May 2025
दोन देशांत अचानक कोविडचे रुग्ण वाढले
16 May 2025
सध्या पाकिस्तानकडे अणु कार्डचा पर्याय नाही
11 May 2025
देवदर्शन करून परतणार्या पिता-पुत्रावर काळाचा घाला
16 May 2025
कोण आहेत विक्रम मिस्री?
12 May 2025
हरता हरता जिंकले!
11 May 2025
ठाण्यात २ कोटींचे अमली पदार्थ जप्त
13 May 2025
दोन देशांत अचानक कोविडचे रुग्ण वाढले
16 May 2025
सध्या पाकिस्तानकडे अणु कार्डचा पर्याय नाही
11 May 2025
देवदर्शन करून परतणार्या पिता-पुत्रावर काळाचा घाला
16 May 2025
कोण आहेत विक्रम मिस्री?
12 May 2025
हरता हरता जिंकले!
11 May 2025
ठाण्यात २ कोटींचे अमली पदार्थ जप्त
13 May 2025
दोन देशांत अचानक कोविडचे रुग्ण वाढले
16 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जातींची नोंद काय साधणार?
2
राज्यात चार दिवस अवकाळी पाऊस
3
कॅनडा-भारत संबंधात गोडवा येणार?
4
भारताने ताकद दाखवली
5
व्यापार युद्धाचा चीनला फटका
6
विकास की विनाश?